जनतेने विखे यांच्या दहशतीचे झाकण उडवले, जे काही बाकी आहे तेही उडणार — आमदार बाळासाहेब थोरात 

प्रतिनिधी —  

देश पातळीवर भाजपाकडून होत असलेले द्वेष भावनेचे राजकारण आणि राज्यांमध्ये चुकीचा पायंडा पाडून आलेले सरकार हे जनतेला मान्य झाले नाही. अहमदनगर जिल्ह्यात मंत्री विखे यांच्याकडून होत असलेले दहशतीचे राजकारण व चुकीच्या पद्धतीने प्रशासना राबविल्यामुळे त्यांचा पराभव झाला आहे. जनतेने विखे यांच्या दहशतीचे झाकण उडवले असून अजून काही बाकी आहे तेही उडणार आहे. असा टोला आमदार बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. विधानसभेत आता पुन्हा महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री असेही आमदार थोरात म्हणाले.

लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर यशोधन कार्यालय या ठिकाणी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्री थोरात, रणजीत सिंह देशमुख, सोमेश्वर दिवटे यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्र पक्षांचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आमदार थोरात म्हणाले की, देशातील सध्याचे राजकारण आणि राज्य पातळीवर चुकीचा पांयडा पाडून आलेले सरकार या विरोधात जनतेमध्ये अत्यंत रोष आहे. जनतेला असे चुकीचे राजकारण मान्य नसून मतदानातून तो जनतेने तो राग व्यक्त केला आहे.

सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला सत्तेचा गैरवापर, त्याचप्रमाणे वाढलेली बेरोजगारी, महागाई, भरती मधील गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत गैर व्यवहार, राज्यात बिघडलेली राज्यातील शांतता सुव्यवस्था यामुळे जनता या सरकारवर नाराज आहे.

भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार नसतानाही सातत्याने जनतेमध्ये संपर्कात होते. त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत..

तसेच अहमदनगर मध्ये सुजय विखे हे तरुण खासदार होते. त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील मात्र मंत्री विखे यांनी ज्या पद्धतीने दहशतीचे राजकारण करून चुकीचे प्रशासन राबवले याबद्दल जिल्ह्यात मोठा रोष निर्माण झाला. जनतेने विखे यांच्या दहशतीचे झाकण उडवले असून अजून काही बाकी आहे तेही उडणार आहे.

निलेश लंके हा एक सामान्य कार्यकर्ता आहे. कोरोना काळात त्यांनी मोठे काम केले. परंतु पारनेर मध्ये सरकारकडून निर्माण केलेली दहशत यामुळे निलेश लंके यांनी त्यांना मोठी टक्कर देऊन विजय मिळवला आहे.

काँग्रेसचा विचार हा शाश्वत विचार असून देशाच्या विकासाचा विचार आहे. त्याला ताकद देण्याचे काम सर्वांनी करायचे आहे. राज्यात महाविकास आघाडीला मोठे अनुकूल वातावरण असून आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचा सरकार येणार असून मुख्यमंत्रीही महाविकास आघाडीचा होणार आहे.

खरे तर राज्यामध्ये सध्याचे सरकार कसे आले हे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री यांना माहिती आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. कारण जनतेला सर्व माहिती आहे. या सरकारविरुद्ध जनतेने राग व्यक्त केला असून महाविकास आघाडीला मोठा भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल आमदार बाळासाहेब थोरात यांनी जनतेचे आभार व्यक्त केले असून हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विजय असून यामध्ये काम केलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे कौतुकही त्यांनी केले. यावेळी गुलालाची उधळण करत जिलेबी वाटत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!