उपसा जलसिंचन योजनांवरील स्थगिती उठवून पाणी द्या – माजी मंत्री थोरात
संगमनेर प्रतिनिधी —
निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. हे सर्व जनतेला माहित आहे मात्र याचे श्रेय दुसरेच घेत आहे. आपण श्रेयासाठी कधीही काम केले नाही. भोजापुर चारी कामासाठी पाठपुराव्यासह या भागातील गावांसाठी उपसा जलसिंचन योजना आपण केल्या होत्या. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी त्या रद्द केले असून या योजनांवरील स्थगिती तातडीने उठून पाणी द्या अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

काकडवाडी येथे सहकारी सेवा सोसायटीच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते तर व्यासपीठावर बी.आर चकोर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमर कतारी, संपतराव गोडगे, सुभाष सांगळे, अनिल कांदळकर, सखाराम शरमाळे, अनिल घुगे, सरपंच जनार्दन कासार, सुनील कासार,अशोक मुळे, चेअरमन संतोष काळे, व्हा.चेअरमन भाऊसाहेब जगताप, दिलीप शिरसाट, त्रंबक गायकवाड, सचिन गायकवाड ,कैलास मुळे, वाल्मीक मुळे, संतोष मुळे, संजय गायकवाड, बाळू कासार ,सोमनाथ गांडोळे, नानासाहेब गायकवाड ,संतोष ढवळे, बाळा शिरसाट, आदिनाथ झुरळे, केशव शिरसाट, विठ्ठल मुळे ,अशोक शिरसाट, केशरबाई मुळे, अलका मुळे, इंदुबाई ढवळे, मंदा ढवळे, बाबासाहेब गायकवाड, सदाशिव गायकवाड, रभाजी गांडोळे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, भोजपुर चारीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला अनेक वेळा पाणी दिले यावर्षी चांगला पाऊस झाला म्हणून लवकर पाणी आले ज्या लोकांना चारी माहिती नव्हती ते आता श्रेय घेऊन पाहत आहेत.
निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले श्रेय मात्र दुसरी घेत आहे खरे जनतेला माहित आहे. निमोण नान्नज दुमाला पंचक्रोशीतील गावांना भोजपूर सह निळवंडे कालव्यांचे पाणी देण्यासाठी उपसा जलसिंचन योजना आपण मंजूर केल्या होत्या. कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी मिळेल याकरता मध्य प्रदेश मधील माधवपूरच्या धरतीवर आपण पॅटर्न राबवण्याचे नियोजित केले होते यासाठी आपले कामही सुरू आहे .मात्र महाविकास आघाडी सरकार बदलले आणि सध्याच्या सरकारने या उपसा जलसिंचन योजना रद्द केल्या. खरे तर पहिला या उपसा सिंचन स्थगिती उठून पाणी द्या. आपण सातत्याने काम केले मात्र काही मंडळी द्वेष पसरवण्याचे काम करत आहे अशा लोकांना वेळीच रोखा असे आवाहन त्यांनी केले.


याप्रसंगी ज्ञानदेव काळे सचिव संजय गडाख संपत शिरसाठ रामनाथ शिरसाट कैलास गिरी यांच्यासह गावातील ग्रामस्थ व नागरिक व शिवभक्त युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच जनार्दन कासार यांनी केले सूत्रसंचालन सुनील कासार यांनी केले तर सोसायटीचे चेअरमन संतोष काळे यांनी आभार मानले.
