संगमनेरातील खाद्यतेल भेसळ प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

अन्न भेसळ व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करा —

तक्रारदार सुनील घुले यांची मागणी

प्रतिनिधी —

संगमनेर शहरात असणाऱ्या खाद्यतेल निर्मिती कंपन्यांमध्ये तेलामधून भेसळ होत असल्याचा आरोप करीत संगमनेर शहरातील घुलेवाडी येथील भेळ विक्रेते सुनील घुले यांनी उपोषण आंदोलन केले होते. या तेल निर्मिती कंपन्यांच्या तेलात भेसळ असल्याचा अहवाल त्यांच्याकडे होता. त्यांच्या तक्रारीवरून अन्न भेसळ व औषध प्रशासन, अहमदनगर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगमनेर येथे येऊन कारवाई करत काही सॅम्पल तपासणीसाठी नेले होते आणि त्या आश्वासनावर घळाए यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र एक महिन्याचा कालावधी होऊनही कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने आणि कार्यवाही विषयी हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा संशय आल्याने घुले यांनी जॉईंट कमिशनर अन्न व औषध प्रशासन यांच्यासह एसीबी कडे तक्रार केली आहे.

या बाबत संगमनेर येथील भेळ व्यावसायिक सुनील घुले यांनी जॉईन्ट  कमिशनर अन्न औषध प्रशासन विभाग नासिक उद्योग भवन त्र्यंबक रोड नासिक, यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, मी आपल्याकडे अर्जाद्वारे तक्रार केली होती की, संगमनेर (जिल्हा अहमदनगर) येथील श्याम ऑइल इंडस्ट्री, भंडारी ऍग्रो, एसव्ही असावा या तेल कंपन्या भेसळयुक्त तेल तयार करून विक्री करत आहेत.

सदर प्रकरणात अहमदनगर येथील कार्यालयाने व तेथील अधिकाऱ्यांनी आणि आपण देखील सदर प्रकरणात कोणतीही कारवाई केल्याचे दिसत नाही. अहमदनगर येथील कार्यालयात तक्रार देऊन जवळपास चार महिन्यांचा काळ लोटला आहे तरी पण कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. 01 जुलै 2024 पासून मी प्रांत कार्यालय संगमनेर या ठिकाणी उपोषण सुरू केले होते सदर उपोषणा दरम्यान विभागाशी संबंधित अधिकारी उपोषण सोडवण्यासाठी आले व तयोग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

आश्वासन दिल्यानंतर देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. संगमनेर येथील काही किराणा दुकानातून तेलाचे सॅम्पल नेले. परंतु आम्ही शेंगदाणा तेलाचे सॅम्पल घेण्यास विनंती केली असता ते सॅम्पल न घेता इतर सॅम्पल घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वेळोवेळी विचारणा केली. कुठलीही माहिती दिली जात नाही सदर अधिकारी काम चुकारपणा करत आहेत. या प्रकरणात नगर येथील अधिकाऱ्यांनी त्या तेल कंपन्यांकडून पैसे घेऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे मला खात्रीलायक समजले आहे. अधिकारी या प्रकरणात सामील आहेत असे मला वाटते. या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या नावावर व इतर नातेवाईकांच्या नावावर लाखो रुपयाची संपत्ती जमवल्याची माहिती मिळालेली आहे. तरी सदर अधिकाऱ्यांची आपण एसीबी मार्फत चौकशी करून कारवाई करावी याबाबत मी एसीबी कडे देखील तक्रार केली असल्याचे घुले यांनी म्हटले आहे.

आपले स्तरावर तक्रार दाखल करूनही कारवाई होत नाही. तेलात भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळणे हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याने आपण जर सदर प्रकरणावर रितसर कारवाई केली नाही तर शेवटी आम्हाला न्याय मागण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल. जर आम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याची वेळ आली तर आम्ही भेसळयुक्त तेल कंपनीचे संचालक, मालक यांच्यासोबत संबंधित अधिकारी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करू. सध्या शेंगदाण्याचे तेल बाजारात 350 रुपये लिटर प्रमाणे मिळते. श्याम ऑइल मिल, भंडारी ऍग्रो व एसव्ही असावा ह्या तेल कंपनीचे मालक शेंगदाण्याचे तेल 140 रुपये लिटरने विक्री करतात. एवढे स्वस्त हे शुद्ध तेल देऊ शकत नाहीत. सर्व काही समस्यास्पद आहे. शेंगदाण्याचे तेल चाचणी करण्यासाठी आम्ही पुणे येथील अधिकृत लॅबला तपासले असता यात भेसळ असल्याचे रिपोर्ट मिळाले आहेत. असे दिलेल्या तक्रार अर्जात घुले यांनी नोंदविलेले असून दिल्ली येथील केंद्रीय अन्न सुरक्षा विभागात देखील तक्रार केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!