माजी सरपंच काशिनाथ दगडू पाटील हरिश्चंद्रे (खडांबे खुर्द ) यांचे निधन

प्रतिनिधी —

राहुरी तालक्यातील खडांबे खुर्द येथील माजी सरपंच काशिनाथ दगडू पाटील हरिश्चंद्रे (आण्णा) यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले ते ८० वर्षाचे होते.

खडांबे खुर्द गावातच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीत आपल्या सामाजिक कार्याने ते लोकप्रिय होते. खडांबे खुर्द गावाचा जवळपास ३० ते ३५ वर्ष त्यांनी सरपंच पदाचा कार्यभार अतिशय चोख आणि प्रामाणिकपणे सांभाळला. प्रसंगी आपल्या संसाराकडे त्यांनी दुर्लक्ष करून गावचा विकास हा एकच ध्यास त्यांच्या मनात होता.

सरपंच पदी विराजमान असताना देखील भल्या पहाटे गावातील पिण्याचे आणि वापराचे पाणी पुरवठा स्वतः चालु वा बंद करत होते. असे एक ना अनेक कामे ते स्वतः करत होते. ते कधीच कोणत्या कर्मचाऱ्याची वाट पाहत बसत नव्हते. म्हणूनच संपुर्ण परिसरात त्यांची वेगळीच ओळख निर्माण झालेली असल्याने आजही प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यावा असे हे व्यक्तिमत्त्व होते.

ते स्वर्गवासी झालेले असले तरी देखील आजही सामाजिक कार्याने ते लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या मानात एक वेगळीच ओळख निर्माण करून गेलेले आहेत. ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद, कोणत्याही स्तरावरचे काम असो ते निःस्वार्थपणे मार्गी लावत असत. नेहमीच गोरगरीब जनतेला न्याय देण्याची त्यांची भूमिका शेवटपर्यंत होती.

त्यांच्या निधनाने संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, मुलगी, जावई, भाऊ, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

दशक्रिया विधी रविवार ता. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ७:०० वाजता खडांबे खुर्द येथील अमरधाम या ठिकाणी होणार असून ह.भ.प. भागवत महाराज जंगले- (डोंगरगण) यांचे प्रवचन होणार आहे…

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!