घोटीच्या युवकांची २८ वर्षांपासून सर्वोच्च कळसुबाई शिखरावर अखंडितपणे घटस्थापना !

प्रतिनिधी —

घोटी शहरातील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक इ.स.१९९७ पासून म्हणजेच गेल्या २८ वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वोच्च असलेल्या कळसुबाई शिखरावर नवरात्रीत घटस्थापना करून विजयादशमी पर्यंत नऊ दिवस उपवास करून दररोज सर्वोच्च शिखर सर करून कळसुआईची मनोभावे पूजा करतात.

कळसुबाई मित्र मंडळाचे सर्व गिर्यारोहक आपले व्यवसाय,कामधंदा सांभाळीत २८ वर्षांपासून अखंडितपणे हा अनोखा छंद जोपासतात.या आगळ्यावेगळ्या छंदाची जोपासना करणाऱ्या गिर्यारोहकांची दखल घेत संगमनेर येथील प्रसिध्द मालपाणी उद्योग समूहाचे मालक संजय मालपाणी,मनीष मालपाणी,स्वदेश उद्योग समूहाचे मालक बाळासाहेब देशमाने तसेच इगतपुरी तालुक्यातील प्रसिध्द उद्योजक व खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला गिर्यारोहकांचे शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कळसुबाई शिखरावर घटस्थापना करण्यासाठी उद्योजकांनी घटकलशाचे मनोभावे पूजन करून कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांना घटकलश सुपूर्द केला.मंडळाच्या गिर्यारोहकांनी आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पहाटेच शिखर सर करून शिखरस्वामीनी कळसुआईचे मनोभावे पूजन व आरती करून सर्वोच्च शिखरावर घटस्थापना केली.या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या स्तुत्यउपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे,सोमनाथ भगत,निलेश आंबेकर,निलेश पवार,गणेश काळे,प्रवीण भटाटे,काळू भोर,सुधाकर तांबे,संजय जाधव,राजू माने,भगवान तोकडे,नाना टाकळकर,शरद महाले,नितीन भागवत,संकेत वाडेकर,चेतन जाधव,चेतन छत्रे,नामदेव जोशी,सोनू गीते,बाळू आरोटे,ज्ञानेश्वर मांडे,डॉ.कैलास गायकर,डॉ.महेंद्र आडोळे,अभियंता मयूर मराडे,अभियंता सचिन लंगडे,विकास जाधव,योगेश शिरसाठ,संजय शेवाळे,गोकुळ सूर्यवंशी,अशोक हेमके,भानुदास जाधव,कैलास नवले,बाळू भोईर,श्रावण सोपे,रोशन लहाने,अवधूत दिवटे,देविदास पाखरे,उमेश दिवाकर तसेच इतर गिर्यारोहक महिला भगिनी सहभागी झाले होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!